Monday, August 12, 2013

किश्तवारचे `धर्म`संकट...

किश्तवारमध्ये ईदच्या नमाजानंतर मुसलमान जमावाने हिंदुंवर सशस्त्र हल्ला चढविला. संसदेत केलेल्या निवेदनात सुद्धा हाच उल्लेख आहे. आरंभी अनपेक्षित हल्ल्यामुळे गोंधळलेले हिंदू लवकरच प्रतिकारास सज्ज झाले आणि जम्मू भागात अनेक ठिकाणी त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. हिंदुनी प्रतिकार केला, की तो सर्वधर्मभावास धोका असतो, असा मानवतावाद्यांचा इतिहास सांगतो...!
बाकी चर्चा दूर ठेवून किश्तवारच्या धोक्याची माहिती इथे करून घेवू. ही केवळ एका गावापुरती दंगल नाही, याची नोंद इथे आधी घ्यावी लागेल. १९८८-८९ मध्ये सुमारे २० लाख हिंदुना काश्मीर खोर्यातून विस्थापित व्हावे लागले. लाखाहून अधिक हिंदू पुरुषांची हत्या झाली आणि हजारो हिंदू महिला-मुलींवर बलात्कार झाले. किश्तवार प्रकरण हे काश्मीरच्या दुसऱ्या अहिंदू-करणाची सुरवात आहे.
आपण एक एक मुद्दा समजून घेवू.
हा आहे काश्मीरचा नकाशा.


हा भारतात दाखविला जातो. यातील पाकिस्तानलागतचा आकाशी रंगाचा पट्टा आपण `पाकव्याप्त काश्मीर` म्हणून नोंदवतो. त्या भागातील गावे-जिल्हे सुद्धा भारतीय नकाशावर नोंदविलेले नसतात. नेहरू यांनी १९४७-४८ मध्येच हा भाग प्रत्यक्षात सोडून दिला. मात्र नकाशात तो दाखविला जातो. याला पाकिस्तानात `आजाद काश्मीर` म्हटले जाते.
हा दुसरा नकाशा.
यात जम्मू -काश्मीरचे ५ भाग दिसतात. पहिला कथित `आजाद काश्मीर`, दुसरा गील्गीत – बाल्टीस्तान, तिसरा अक्साई चीन – हा भाग १९६२ च्या `भाई भाई युद्धात` चीन ने आक्रमिला. अक्साई चीन आणि बाल्टीस्तान यांच्या मध्ये असलेला काश्मीरचा एक भाग पाकिस्तान ने चीन ला परस्पर भेट दिला. हा सगळा भाग वजा जाता भारताच्या ताब्यात जेमतेम निम्माच काश्मीर उरतो.


 आता हा नकाशा पाहू. 

या नकाशात भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या भूभागाची जिल्ह्यांच्या स्वरूपातील विभागणी आहे. कुपवाडा, श्रीनगर, बरामुला, बडगाम, बांदीपोर, गनदरबाल, पूंच, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, राजौरी, रेसि, रामबन हे भाग काश्मीर खोऱ्यात मोडतात. जम्मू, उधमपूर, दोडा, कथुआ, किश्तवार  हे भाग जम्मू विभागात येतात. कारगिल खोऱ्यातच मोडते पण इथे लोकवस्ती अत्यंत विरळ आहे. उजवीकडे लेह-लडाख आहे.

यापैकी काश्मीर खोऱ्यातून म्हणजे श्रीनगर, बरामुला, बडगाम, बांदीपोर, गनदरबाल, पूंच, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग, राजौरी, रेसि, रामबन या जिल्ह्यातून १९८८ ते १९९१ या काळात सुमारे २० लाख हिंदुना अनन्वित अत्याचार करून बाहेर काढण्यात आले. तेथे ग्रामीण भागात एकही हिंदू सापडत नाही. शहरी भागात एखाद्या गुरुद्वाराच्या आडोशाला, मंदिरात क्वचित कुणीतरी सापडतो. पण लोकसंख्येचे प्रमाण पहिले तर हे प्रमाण पाव टक्का सुद्धा नाही.

हा सारा भाग भारतापासून तुटल्यात जमा आहे. काश्मीर टूरवर जाऊन आलेले भारतीय पर्यटक सांगतात – 'आता काश्मिरात दहशतवाद उरला नाही.' वस्तुस्थिती ही आहे, की आज काश्मिर भारतात आहे, त्याचे श्रेय जाते सीआरपीएफ ला. हा वेगळा विषय आहे. त्यावर नंतर विस्ताराने लिहीन. पर्यटक फक्त श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात जाऊ शकतात. त्यातही केवळ पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या भागातच. श्रीनगर शहराच्या जुन्या भागात कोणीही फिरकू शकत नाही. तेथे भारतविरोधी राग धुमसत असतो. इतरत्रही भारतीयांचे स्वागत होते ते प्रामुख्याने पर्यटक म्हणून. तेथील अर्थव्यवस्था केवळ त्यावर अवलंबून आहे. हेच त्याचे कारण.

पुन्हा किश्तवारकडे येऊ. पुन्हा एकदा हा नकाशा पाहा.


किश्तवार जिल्हा हा काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेश यांना थेट जोडतो. यातील निम्म्याहून अधिक भाग अतिरेक्यांनी ग्रासलेला आहे. किश्तवारचे भौगोलिक स्थान पहिले तर लक्षात येईल, की तेथून हिंदुना बाहेर काढले की उरतो फक्त जम्मू, उधमपूर, सांबा आणि कथुआ...

संसदेत अरुण जेटली यांनी किश्तवार हल्ल्यामागे मोठ्या कटकारस्थानाचा उल्लेख केला, ते हेच. आणि मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला हे सुद्धा `१९८८ प्रमाणे आता होणार नाही` चा राग आळवू लागले आहेत. अर्थात हा सारा अब्दुल्ला परिवाराचा पिढीजात दांभिकपणा आहे. ज्या परिवाराच्या कट-कारस्थानामुळे श्यामाप्रसाद मुकर्जी यांच्यासारख्या देशभक्ताला काश्मिरात तुरुंगवासात संशयास्पद स्थितीत मरण आले, तेथून दुसरी अपेक्षा काय करणार?

ही जागे राहण्याची वेळ आहे. किश्तवारमधील हिंदू सुरक्षित राहिले पाहिजेत आणि काश्मीर खोर्यातील प्रत्येक विस्थापिताला त्याच्या गावी परत जाता आले पाहिजे. तरच भारताचे मस्तक मानले जाणारे जम्मू काश्मीर भारतात राहील... अन्यथा लवकरच भारताचा शिरच्छेद होईल. ज्या भूभागातून हिंदू अल्पसंख्य झाले, तो भाग भारतापासून तुटला हे इतिहास लक्षात घ्यावा लागेल...
- दत्ता जोशी.

No comments: