Saturday, October 26, 2013
Thursday, October 3, 2013
माझ्या आईची अन्जिओप्लास्टि आणि डॉ. हिरेमठ यांचे कुशल हात...
पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.
जगदीश हिरेमठ (http://www.jshiremath.com/index.htm) यांच्याबद्दल बऱ्याच काळपासून ऐकून होतो. पण माझ्या
आईवरील अन्जिओप्लास्टि शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्याशी संपर्क आला आणि मी खूप प्रभावित झालो. हाच
प्रकार पुण्याच्या `रुबी हॉल क्लिनिक`बद्दलही अनुभवला... (http://www.rubyhall.com/) एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही साधारण दोन दिवस पेशंटबरोबर असता, आणि या
काळात एकदाही तुम्हाला आवाज चढवावा लागत नाही, वाद घालावा लागत नाही... प्रत्येक
गोष्ट ठरल्याप्रमाणे वेळच्या वेळी घडत असते. अचानक पेच उद्भवला तर तुमच्याही आधी
तेथील डॉक्टर आणि कर्मचारी धाव घेतात... हे चित्र मला अनपेक्षित पण अतिशय आनंद
देणारे होते.
एखादा डॉक्टर नुसत्या
शब्दांनीच तुमचा विश्वास जिंकून घेतो आणि अतिशय गंभीर विषय सुद्धा तुम्हाला खूप
सोपा वाटू लागतो. तुम्ही त्यांच्या आश्वासक शब्दांनी भारून जाता आणि हृदयाशी
संबंधित खूप नाजूक शस्रक्रिया ते लीलया पार पाडतात... या दरम्यान तुमच्या मनावर एक
क्षणभरही ताण येत नाही... डॉ. जगदीश हिरेमठ ही किमया करतात. त्यांच्यातील `जॉली`
माणूस आपल्याला प्रभावित करतो...!
माझ्या आईला चालताना खूप दम
लागत असे. पाच-सहा वर्षांपूर्वी केलेल्या तपासणीत हृदयाच्या रक्तवाहिनीत २ ब्लॉक
दिसले होते, पण ते फार गंभीर नव्हते. मागील महिन्यात झालेल्या एका किरकोळ अपघानंतर
तिचे ब्लड-प्रेशर वाढले आणि खूप धाप लागू लागली.
माझा भाऊ कमलाकर पुण्यात
राहतो. त्याने आईला `रुबी`त डॉ. हिरेमठ यांना दाखविण्याचे ठरविले. डॉ. हिरेमठ आज
घडीला या विषयात देशातील आघाडीचे सर्जन आहेत... त्यांनी `आधी अन्जिओग्राफी करू आणि
गरज वाटली तर लगेच प्लास्टि करू`, असे सांगितले. ग्राफीमध्ये दोन रक्तवाहिन्यांत
९० आणि ९५ टक्के ब्लॉक दिसले. याचा अर्थ फक्त तिसऱ्या रक्तवाहिनीच्या बळावर आईचे
श्वास चालू होते! ही अतिशय गंभीर बाब होती.
डॉ. हिरेमठ यांनी
`ग्राफी`नंतर बाहेर येऊन आम्हाला नेमका प्रोब्लेम समजावून दिला. हृदयाचे एक चित्र
समोर ठेवून त्यांनी नेमकी रचना समजावून दिली. आम्ही त्या आधी यु-ट्यूबवर या
प्रकारच्या शस्त्रक्रियेचे अनिमेशन पाहिलेले होते. ( http://www.youtube.com/watch?v=e13TGGccvT4 ) त्यांचा अप्रोच इतका आश्वासक होता की आम्हाला या
शस्त्रक्रियेचे `टेन्शन` अजिबात आले नाही. यातील एक ब्लॉक सरळ रेषेतील होता आणि
दुसरा वळणा-वळणाच्या जागेत. हा दुसरा ब्लॉक दुरुस्त करण्यासाठी स्तेंत बसविणे अधिक
अवघड होते. पण त्यांचा अनुभव इतका मोठा, की जेथे आम्ही एक-दीड तासाची तयारी केली
होती, तेथे अर्ध्या तासातच ऑपरेशन यशस्वीही झाले...!
या नंतरचा काळ काळजी
घेण्याचा होता. आईला `आयसीयू`त ठेवलेले होते. २४ तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर ते
घरी सोडणार होते. या २४ तासात मला तेथे खूप काही अनुभवता आले. `रुबी`मध्ये गर्दी
प्रचंड वाटले, पण कुठे गोंधळ दिसला नाही. स्वच्छता अतिशय उत्तम होतीच आणि तेथे काम
करणाऱ्या वार्डबॉय पासून डॉक्टरपर्यंत सर्वचजण विलक्षण सौजन्याने वागताना दिसले.
हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होते. या आधी वेगवेगळ्या कारणांसाठी मी अनेक
हॉस्पिटलमध्ये गेलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी वाद झडले आहेत. रुबी मात्र अपवाद
ठरला...!
एका जीवघेण्या स्थितीतून आई
बाहेर आली हे जितके महत्वाचे, तितकेच डॉ. हिरेमठ यांचे `safe hand` महत्वाचे...!
डॉ. हिरेमठ आणि `रुबी` या दोघांनाही शुभेच्छा.
Wednesday, September 18, 2013
पाणीटंचाई मुक्तीचा ‘जालना पॅटर्न’
जालन्याचा पाणीप्रश्न सन 2013 च्या उन्हाळ्यात जगभरात गाजला. सार्या जगाच्या सहानुभूतीच्या नजरा या जिल्ह्याकडे वळल्या. कुचेष्टेच्या स्वरात बोलायचे तर हा ‘दुष्काळी पर्यटनाचा सोहळा’च झाला. पण कधी कधी मोठी आपत्ती इष्टापत्ती ठरते. जालन्याच्या बाबतीच असेच काहीसे घडते आहे. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीला साजेशी चळवळ जालन्यात उभी राहिली आणि जालन्याकडे सहानुभूतीने वळणार्या नजरा कौतुकाने वळविण्याचे बिजारोपण याच उन्हाळ्यातील चार महिन्यांत झाले. हे होत असतानाच विक्रमी कालावधीत, अत्यंत कमी खर्चात सार्वजनिक कामे कशी उभी राहू शकतात, याचा वस्तुपाठही या शहराने घालून दिला... ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकाराने हाती घेण्यात आलेले हे काम श्री. रमेशजी पटेल, श्री. सुनीलजी रायठठ्ठा आणि सौ. सपनाजी सुनील गोयल यांच्या नेतृत्वाखाली आकार घेते आहे.
जालन्याचा पाणीप्रश्न नेतृत्वाच्या अकर्मण्यतेचा परिपाक आहे, ही बाब असंख्य वेळा अधोरेखित झाली आहे. निजामाच्या काळात 1935 मध्ये खोदण्यात आलेल्या घाणेवाडीच्या तलावाने जालन्याची तहान सातत्याने भागविली. पण 78 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात या तलावात खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आणि साहजिकच तलावाची साठवणक्षमता जेमतेम 25 टक्क्यांवर आली. कुंडलिका नदीवर निधोना गावाच्या उत्तरेकडे बांधण्यात आलेल्या या तलावाच्या बंधार्याची रुंदी 836 मीटर तर उंची 15 मीटर आहे. साचलेल्या गाळामुळे ही उंची जेमतेम पाच मीटरपर्यंत राहिली. उंची एक तृतियांश उरली तरी क्षमता त्याच्या अनेक पटीत कमी झाली, कारण पाण्याची खोली कमी झाल्याने बाष्पिभवनाचे प्रमाण वाढले. या तलावातील गाळ उपसला आणि पाण्याची साठवणक्षमता वाढविली, तर आजही हा तलाव जालनेकरांची वर्षभराची तहान भागवेल, हे स्पष्ट दिसत असताना प्रशासन ढिम्म होते आणि लोकप्रतिनिधी उदासीन.
घाणेवाडी तलावातील गाळ
या पार्श्वभूमीवर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ची स्थापना ‘विक्रम चहा’चे श्री. रमेशजी पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांना श्री. सुनीलजी रायठठ्ठा यांची साथ मिळाली. जालन्याच्या नागरिकांतून काही प्रमाणात निधी उभा राहण्यास प्रारंभ झाला आणि सन 2010 च्या उन्हाळ्यात घाणेवाडी तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून सलग चार वर्षे, दर वर्षी नित्यनेमाने हे काम सुरू आहे. दर वर्षी तलाव कोरडा पडल्यानंतर साधारणपणे तीन ते चार महिने मर्यादित साधनांद्वारे हे काम केले जाते. साधारणपणे 45 हजार ट्रॅक्टर गाळ दरवर्षी बाहेर काढला जातो. जालन्यातून दरवर्षी साधारण 20 लाख रुपये उभे राहतात आणि त्या द्वारे यंत्रणा वापरात आणून हे काम करण्यात येते. तलावात साचलेल्या गाळाच्या उंचीचा अंदाज या वर्षीच्या उन्हाळ्यात प्रशासनाने पाण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांतून घेता येतो. ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने खोदलेल्या साधारण 10 फुट खोल पातळीच्याही खाली साधारण 10 फुटांचा खड्डा प्रशासनाने घेतला. त्यातही गाळाची पातळी साधारणपणे 2 फुटांची दिसते. याचाच अर्थ, तलावातील सर्वसाधारणपणे गाळाची पातळी 12 फुटांची आहे. मागील चार वर्षांत झालेले काम जेमतेम एक ते दोन टक्क्यांचेच आहे. 670 एकरांच्या तलावातील साधारणपणे 20 ते 25 एकरांच्या क्षेत्रातील सरासरी 8 फुटांचा गाळ काढण्यात आजवर यश आले आहे. याच गतीने हे काम चालू राहिले, तर हे काम साधारण 100 ते 125 वर्षे पुरेल ! प्रशासनाने या कामात पुढाकार घेत किमान 50 ‘पोकलेन’ व ‘जेसीबी’ची यंत्रणा उपलब्ध करून दिली आणि त्याला 250 हून अधिक टिप्परची जोड दिली, तर कदाचित हे काम साधारणपणे पाच उन्हाळ्यांत मिळून पूर्ण हेऊ शकेल आणि जालनेकरांची तहान पूर्णपणे भागवता येईल.
कुंडलिका नदीवरील बंधारे
घाणेवाडी तलावापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर निधोना गाव आहे. कुंडलिका नदी या गावाला वळसा घालून पुढे वाहते. साधारण 8 किलोमीटरचा प्रवास करीत ही नदी जालना येथे पोहोचते. धरणातील गाळाप्रमाणेच या नदीचीही स्थिती झालेली असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘घाणेवाडी जलसंरक्षण मंचा’ने या नदीवर शिरपूर पद्धतीचे बंधारे बांधण्याचे ठरविले.
राज्यभरात गाजलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यात हे काम सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या कामाचे सार्वत्रिक स्वागत होऊन मदतीचे हात पुढे येण्या ऐवजी अनेकांनी त्यात चक्क अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातून खचून न जाता मंचाने ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकारातून हे काम प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार केला. याचा शुभारंभ झाला 21 एप्रिल 2013 रोजी.
राज्यभरात गाजलेल्या ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालन्यात हे काम सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या कामाचे सार्वत्रिक स्वागत होऊन मदतीचे हात पुढे येण्या ऐवजी अनेकांनी त्यात चक्क अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातून खचून न जाता मंचाने ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’च्या पुढाकारातून हे काम प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्धार केला. याचा शुभारंभ झाला 21 एप्रिल 2013 रोजी.
निधोना गावानजिक या नदीत ‘शिरपूर पॅटर्न’द्वारे सुमारे 500 मीटर पात्र खोल करून त्यावर बांध घालण्याचे ठरवून ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने प्रत्यक्ष कामास प्रारंभ केला. ‘शिरपूर पॅटर्न’चे प्रणेते श्री. सुरेश खानापूरकर यांच्या शुभहस्तेच हा उपक्रमाचा नारळ वाढविण्यात आला. प्रारंभी वाटले तेवढे हे काम सोपे नाही, याची जाणीव हे नदीपात्र खोदताना सर्वांना झाली.

साधारणपणे दोन-तीन फूट खोल गेल्यानंतरच कठिण खडकास सुरवात झाली आणि कामाचा वेग मंदावला. साधारणपणे 30 दिवसांत हे काम पूर्ण व्हावे असे अपेक्षित होते, पण त्याला जास्त वेळ लागणार हे स्पष्ट होऊ लागले. ही सारी कामे पोकलेन आणि जेसीबीद्वारेच चालू होती, हे विशेष.

साधारणपणे दोन-तीन फूट खोल गेल्यानंतरच कठिण खडकास सुरवात झाली आणि कामाचा वेग मंदावला. साधारणपणे 30 दिवसांत हे काम पूर्ण व्हावे असे अपेक्षित होते, पण त्याला जास्त वेळ लागणार हे स्पष्ट होऊ लागले. ही सारी कामे पोकलेन आणि जेसीबीद्वारेच चालू होती, हे विशेष.
घाणेवाडी तलावाजवळ असलेल्या या बंधार्याला ‘बंधारा क्र. 1’ असे नाव देण्यात आले. या बंधार्यानंतर प्रत्येक किलोमीटरवर सुमारे 500 मीटर लांबीचा एक अशा प्रकारे आठ साखळी बंधारे घालण्याची संकल्पना ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’तर्फे मांडण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रत्येक किलोमीटरवर पाणी साठून ते जमिनीत झिरपेल आणि परिसरातील भूजलपातळी उंचावेल, असे अपेक्षित आहे. पण इथे प्रश्न आला आर्थिक क्षमतेचा. त्यामुळे दोन ते सात क्रमांकाचे बंधारे घालण्याचे काम तात्पुरते पुढे ढकलून मंडळाने थेट आठव्या बंधार्याचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
औरंगाबादहून जालना शहरात जाताना कुंडलिका नदी ओलांडावी लागते. या नदीवरून जाताना डाव्या हाताला ‘रामतीर्थ बंधार्या’चे नाव नदीपात्रात स्पष्टपणे दिसू लागते. हाच तो आठवा बंधारा. या बंधार्याने अनेक विक्रम केले. बंधार्याचे भूमीपूजन 11 मे2013 रोजी झाले आणि 11 जून 2013 रोजी हा बंधारा संपूर्ण काम संपवून कार्यान्वित झाला होता! नदीपात्रात 500 मीटर लांबपर्यंत साधारणपणे 6 मीटर खोल खोदकाम करून पात्रातील गाळ, माती, वाळू आणि खडक बाहेर काढण्यात आला आणि तो पात्राच्या कडेने सुरक्षित अंतरावर टाकण्यात आला. नदीपात्र तब्बल 50 मीटरपर्यंत रुंद करण्यात आले. आठव्या क्रमांकाच्या या बंधार्याची लांबी 50 मीटर आहे. बंधार्यालगत नदीची खोली तब्बल 15 फूट आहे. सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधण्यात आलेल्या या बंधार्यात ‘ओव्हरफ्लो’ होणारे पाणी सांडव्यावरूनच वाहून जाण्याची सोय करण्यात आली आहे. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे बंधार्याच्या मुख्या भिंतीला धक्का पोहोचू नये, म्हणून दगडाचे ‘पिचिंग’ करण्यात आले.
बंधार्याच्या कामातील ‘विक्रमांचा विक्रम’
या बंधार्याने अशा प्रकारच्या कामांमध्ये विक्रमांवर विक्रम नोंदविले. वर उल्लेख केल्याप्रमाणे मोठे आकारमान असलेला हा बंधारा ‘सरकारी’ पद्धतीने तयार करायचा, तर नेमका किती काळ लागला असता, याचे उत्तर देणे फारसे अवघड नाही. या साठी किती निधी लागू शकला असता, यावर वेगवेगळी उत्तरे येऊ शकतात, पण कंत्राटदारांच्या खाजगीतील अंदाजानुसार हे काम पूर्ण होण्यासाठी साधारण 6 कोटी रुपयांचे बजेट नक्की लागले असते. हेच काम ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने केवळ 1 कोटी 25 लाखांत पूर्ण केले! भ्रष्टाचार होणार नाही, याची काळजी घेतली आणि कामावर निष्ठा ठेवली, तर काय घडू शकते, याचे उदाहरण म्हणून ‘रामतीर्थ बंधार्या’चे नाव सांगता येईल. 4 पोकलेन, 1 जेसीबी आणि 12 टिप्पर यांच्या सहाय्याने मोजून एका महिन्यात 500 मीटर लांब आणि 50 मीटर रुंदीचे नदीपात्र खोदून हा बंधारा पूर्ण करण्यात आला. या साठी 1000 ट्रक रेडीमिक्स कॉंक्रिट वापरण्यात आले. या बंधार्यात या वर्षी 16 कोटी लिटर पाणी थांबेल आणि जमिनीत पाझरेल.
संपूर्ण लोकसहभागातून, एका रुपयाचीही सरकारी मदत नसताना हे काम विक्रमी वेळात आणि अत्यंत उच्च गुणवत्ता राखत पूर्ण करण्यात आले. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, या साठी प्रारंभिक काळात जालना शहरातील काही समाजाभिमुख उद्योजकांनी पुढाकार घेऊन हा खर्च भागविला.
काम पूर्ण झाल्यानंतर आता ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने 1000/-, 500/- आणि 100/- रुपयांच्या पावत्या छापून त्या द्वारे जालना शहरवासीयांकडून निधीसंकलन करण्याते ठरविले आहे. या बंधार्यासाठी लागलेले सव्वा कोटी रुपये, निधोना गावाजवळील एक कोटी रुपये आणि घाणेवाडीसाठी दरवर्षी लागणारा सुमारे 25 लाखाचा खर्च लोकसहभागातून उभा राहावा, अशी ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ची अपेक्षा आहे. ही अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल, कारण जालनावासी दरवर्षी पाण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतात.
काम पूर्ण झाल्यानंतर आता ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ने 1000/-, 500/- आणि 100/- रुपयांच्या पावत्या छापून त्या द्वारे जालना शहरवासीयांकडून निधीसंकलन करण्याते ठरविले आहे. या बंधार्यासाठी लागलेले सव्वा कोटी रुपये, निधोना गावाजवळील एक कोटी रुपये आणि घाणेवाडीसाठी दरवर्षी लागणारा सुमारे 25 लाखाचा खर्च लोकसहभागातून उभा राहावा, अशी ‘सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळा’ची अपेक्षा आहे. ही अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल, कारण जालनावासी दरवर्षी पाण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करतात.
किती होतो जालनावासियांचा खर्च?
जालना शहराची लोकवस्ती चार लाखांची आहे. येथील नळाला वर्षातील साधारण सहा महिन्यांच्या काळात महिन्यातून एकदा पाणी येते. काही ठिकाणी बोअर आणि विहिरी आहेत, पण तेथील स्थितीही समाधानकारक नाही, कारण भूजलपातळी खूप खोल गेली आहे. जालन्यात 1 हजार लिटर पाण्याचा टँकर या उन्हाळ्यात साधारणपणे 350 रुपयांप्रमाणे विकला गेला. या हिशेबाने विचार केला, तर प्रत्येकाला पुरेसे ठरेल एवढे पाणी दररोज हवे असेल, तर त्याचा सरासरी खर्च 20 रुपये होतो. म्हणजे एका व्यक्तीमागे दरमहा साधारण 500 रुपयांचा खर्च केवळ पाण्याच्या खरेदीचा असतो. 4 लाख लोकांनी दरमहा प्रत्येकी 500 रुपयांचे पाणी विकत घेणे म्हणजे 20 कोटी रुपये एवढा मोठा, अविश्वसनीय आकडा समोर येतो! चार महिने हा खर्च केला, तर तो आकडा 80 कोटींपर्यंत पोहोचतो! या वर्षीप्रमाणे उन्हाळा लांबला, तर पाच महिने केलेला खर्च 100 कोटींपर्यंत पोहोचतो! ‘टँकर लॉबी’ किती प्रभावी आहे, याचा अंदाज यावरून येतो...!
या हिशेबाने बंधार्यांचा खर्च काढला, तर तो सरासरी 2 ते 2.5 कोटींपर्यंत जातो. ‘रामतीर्थ बंधार्या’ला लागलेला 1.25 कोटीचा खर्च हा ना नफा ना तोटा तत्वावर केलेल्या कामामुळे कमी राखता आला. त्या साठी लागणारे लोखंड ‘पोलाद’ने मोफत उपलब्ध करून दिले, पिचिंगला लागणारा शेकडो ट्रक दगड विविध शेतकर्यांनी मोफत दिला, नदीपात्रातील वाळू-गाळाचा उपसा करताना कमी कष्ट लागले, कमी यंत्रणा लागली, त्यामुळे हा खर्च कमी झाला. प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुसार खर्च कमी-अधिक होऊ शकतो. त्यामुळे सरासरी 2 ते 3 कोटी रुपयांचा खर्च गृहित धरला, तरी 24 कोटी रुपयांत हे सर्व 8 बंधारे पूर्ण होऊ शकतात. त्याद्वारे 650 कोटी लिटर पाणि जमिनीत मुरू शकेल. या साठी जालनावासियांनी पुढे येऊन आर्थि मदत उभी करण्याचा निर्धार करणे आवश्यक आहे. शासकीय स्तरावर या विषयात आजवर कोणीही कोणताच पुढाकार घेतलेला नसल्याने, आता शहरवासीयांनीच पाण्याची लढाई पुढे येऊन लढायची आहे, हेच खरे.
![]() |
![]() |
ही लढाई जनतेची, जनतेसाठी
अनेक आर्थिक अडचणी असल्या तरी ही लढाई जनतेचीच आहे आणि ती जनतेनेच लढावयाची आहे, हे निश्चित आहे. कोरड्या आश्वासनांतून हाती काहीच लागत नाही, हे सर्वांनाच उमगले आहे आणि स्वतःहून उभ्या करीत असलेल्या कामांचे परिणाम जनतेला दिसू लागले आहेत. 2013 च्या भीषण दुष्काळाच्या झळा प्रत्येक व्यक्तीलाच बसल्या आहेत. त्यामुळे हा प्रश्न आपल्याच पुढाकाराने सुटू शकेल, याची खात्री समाजाला झाली आहे. आता गरज आहे, ती भरभरून योगदान देत अत्यल्प काळात हे सारे प्रकल्प मार्गी लावण्याची.
जलतज्ज्ञ श्री. सुरेश खानापूरकर यांच्या मते पाण्याच्या स्थितीवरून समृद्धीचे आडाखे बांधायचे, तर ‘‘दररोज नळाला पाणी येते अशी स्थिती असेल, तर बँकेत आपले ‘फिक्स डिपॉझिट’ आहे, असे गृहित धरावे. बोअरचे पाणी काढावे लागत असेल, तर बँकेचे कर्ज काढावे लागल्याचे लक्षात घ्यावे आणि टँकरने पाणी आणावे लागले, तर तुमची दिवाळखोरी जाहिर झाली आहे, असे गृहित धरावे...’’ या दृष्टीने विचार केला, तर जालन्याने आपली दिवाळखोरी कधीच जाहिर केली आहे. यातून उभा राहायचे असेल, तर लोकसहभागाला पर्याय उरलेला नाही.
जलसंधारणाचे परिणाम...
या पार्श्वभूमीवर, जालना जिल्ह्यात झालेल्या या पथदर्शी उपक्रमांचे परिणाम काय झाले? या वर्षी, सन 2013 मध्ये जून महिन्यात अगदी वेळेवर आलेल्या पावसामुळे हे दोन्ही बंधारे पहिल्या पावसात भरले आणि त्या नंतरच्या पावसात भरतच राहिले. पहिल्या बंधार्यातून वाहून गेलेले पाणी दुसर्या बंधार्यात अडकले आणि पाणी जमिनीत मुरण्यास प्रारंभ झाला. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी परिसरातील बोअरला पाणी येण्यास लवकर प्रारंभ झाला आणि विहिरींतील पाण्याची पातळीही अल्पावधीतच वाढलेली दिसली...! नदीपात्रातील बंधारे आणि विस्तारलेले पात्र या मुळे झालेली क्रांती जनतेने प्रत्यक्षात अनुभवली. हे उदाहरण लोकसहभागातूनच आकारास आले!
हा लोकसहभाग कसा मिळतो आहे? एक उदाहरण सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारे ठरावे. रामतीर्थ बंधार्याशेजारी एक दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. त्यात समाजाने आपले योगदान द्यावे, असे अपेक्षित आहे. हे काम सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एक भिकारी तेथे आला. त्याने तिथले काम पाहिले आणि स्वतःकडे असलेले 21 रुपये त्याने दानपेटीत टाकले...! एका सामान्य भिकारी या भावनेने भारलेला असेल, तर समृद्ध समाजाकडून अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय?
-दत्ता जोशी
औरंगाबाद
Monday, September 16, 2013
दोस्ताची सुहागरात आणि ‘आलार्म क्लॉक’
मी आत्मवृत्त लिहिणार आहे... लिहायलाच हवे...
एका सामान्य माणसाच्या आयुष्यातसुद्धा असंख्य वेगळ्या घटना घडत असतात...
माझ्या षष्ट्यब्दीपुर्तीदिनी, १५ जुलै २०३१ रोजी याचे प्रकाशन होईल...
पुस्तकाचे नाव अजून ठरायचे आहे...
पुस्तकाचे नाव अजून ठरायचे आहे...
त्यासाठीचे लेखन आतापासूनच टप्प्याने टप्प्याने सुरु केले आहे. कारण, वयाच्या तिशीच्या आतील घटना पुढे विस्मरणात जाण्याची शक्यता...
या आगामी पुस्तकातील `इब्लिसपणा` या सर्वात छोट्या विभागातील
हा एक लेखांक...
अशी काही निवडक प्रकरणे मी इथे अधून मधून शेयर करीन.....
........
........
दोस्ताचे लग्न झाल्यावर त्याच्या ‘सुहागरात’च्या तयारीची जिम्मेदारी आपल्यावरच येते ना?
मी स्वतःहून अशाच एका ‘सुहागरात’च्या तयारीची जिम्मेदारी घेतली आणि त्याची पहिली रात्र आयुष्यभरासाठी संस्मरणीय करून टाकली...!
कशी?
तेच तर वाचा...!
तेच तर वाचा...!
साहित्य? गुलाबाची 500 फुले, समई-तेल-वात-काडेपेटी, अलार्मची पाच घड्याळे, एक स्टूल. साहित्य वाचून गंमत वाटतेय? मग हे सारे करताना आम्हाला किती गंमत वाटली असेल...? ही घटना आहे साधारण 1997-98 ची...!
आमच्या दोस्ताचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात, थाटमाटात साजरा झाला. लग्न लावून वर्हाड रात्री घरी परतले. सगळीकडे निजानीज झाली. दुसर्या दिवशी सर्वांची विश्रांती झाली. लग्नाची तिसरी रात्र ‘सुहागरात’साठी घरच्यांनी मुक्रर केली. एकदा हा ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला, की पुढच्या वाटा ज्याला-त्याला ठावूक असतात. आमचे रस्ते आम्हाला माहिती होते. दोस्ताच्या आयुष्यातील ही संस्मरणीय रात्र ‘अधिक संस्मरणीय’ करण्याचे मी ठरविले आणि दुसर्या एका दोस्ताला मदतीला घेऊन तयारीला लागलो. माझ्याप्रमाणेच हा दोस्तही ‘अनुभवी’ होता.
आधी एका नर्सरीवाल्याला गाठून 500 गुलाबांची ऑर्डर दिली. फुले संध्याकाळी ताजी ताजी दे, असे त्याला सांगून टाकले. दोस्ताच्या आईकडून एक मोठी समई ताब्यात घेतली. तेल-वात-काडीपेटी घेऊन ठेवली. मग सजवायची रुम ताब्यात घेतली. कॉट वगैरे व्यवस्थित, मजबुत आहे की नाही ते चेक केले. गादी तपासून घेतली. नवे बेडशीट-पिलो कव्हर घालून सारी सज्जता तर झाली. कामवालीकडून आधी रूम स्वच्छ करून घेतली. मग रुमला लॉक केले. बाहेर पडलो. दुसरा ‘अनुभवी’ दोस्त सोबत होताच.
गुलाबाची फुले ताब्यात आल्यानंतर मी त्याला म्हणालो, ‘आपल्याला चार पाच घड्याळे लागतील.’
तो म्हणाला, ‘कशाला?’
मी म्हणालो - ‘तुला काय करायचे? कुठे मिळतील, ते बघ’.
मग आम्ही चार - पाच मित्रांकडे फिरलो. खणखणीत पण वेगवेगळ्या ट्यून्सचा अलार्म असलेली पाच घड्याळे जमविली. पिशवीत टाकून घरी आणली. मग रुम सजवायला सुरवात केली. फुलांच्या पाकळ्या मोकळ्या केल्या. बेडवर अंथरल्या. इतक्या दाट, की बेडशीट दिसू नये! खोलीभर पाकळ्याच पाकळ्या! गुलाबाच्या ओरिजनल सुगंधाचा घमघमाट सुटलेला! एक स्टूल घेतला. त्यावर कव्हर टाकून समई ठेवली. तेल-वात टाकून ठेवली. रुम तर सज्ज झाली. खूप सुंदर दिसत होती. मग आली अलार्म क्लॉकची पाळी. ही घड्याळे ‘सेट’ केली.
साधारणपणे रात्री 9 च्या सुमाराला समई पेटवली, खोलीतील लाईट घालविले, बाहेर आलो आणि दरवाजा बंद करून मी आणि माझा दुसरा दोस्त दरवाजातच बसून राहिलो. इकडे ‘सुहागरात’वाल्या दोस्ताची (आणि त्याच्या बायकोचीही) बेचैनी वाढत होती. आम्ही खोलीचा ताबा त्यांना देण्यास तयार होतो, पण त्या आधी आमचा ‘मेहनताना’ म्हणून त्यांनी प्रत्येकी हजार हजार रुपये दिले पाहिजेत, असा आमचा आग्रह होता. थोड्या कमी रकमेवर तडजोड झाली. (अर्थात ‘मेहनतान्या’चा आग्रह पैसे मिळविण्यापेक्षाही त्यांची बेचैनी वाढविण्यासाठीच होता, हे सूज्ञ वाचकांनी ओळखलेच असेल! दुसऱ्या दिवशी याच ‘मेहनतान्या’तून त्याला `कोनिका`चे ३ रोल खरेदी करून दिले आणि बाकी पैसेही परत केले, ही गोष्ट निराळी.) अखेर ‘नवपरिणित दाम्पत्या’ने शयनकक्षात प्रवेश केला. त्यांना एकांत देऊन आम्ही तेथून निघून आपापल्या घरी परतलो.
आता मला उत्सुकता लागली होती - अलार्म घड्याळांनी बजावलेल्या कामगिरीची!
मात्र, दुसर्या दिवशी सकाळी दोस्ताकडे जायची हिम्मत होत नव्हती!
तो काय करील, याची शाश्वती नव्हती. कदाचित त्यातील एखादे घड्याळ तो माझ्या डोक्यात फेकून मारण्याचीही शक्यता होती!
मी दुसर्या दोस्ताला भरीला पाडले. सकाळी 10 च्या सुमारास घरी फोन करून अंदाज घेण्यास सांगितले. तेव्हा मोबाईल नव्हते. लँडलाईनवर फोन करून त्याने अंदाज घेतला आणि मला ग्रीन सिग्नल दिला.
ग्रीन सिग्नल मिळूनही, मी दबकत दबकतच 12 च्या सुमारास सुहागरातवाल्या दोस्ताच्या घरी पोहोचलो. मी दारापर्यंत पोहोचतो, न पोहोचतो तेव्हाच दोस्त अंगावर धावून आला. घरातच असल्याने बिचार्याच्या तोंडी त्यातल्या त्यात सौम्य शिव्या होत्या.
त्याची रात्र ‘संस्मरणीय’ ठरल्याची माझी खात्री झाली.
मी घरात पहिले, आम्ही मोठ्या मिनतवारीने जमविलेली सगळी घड्याळे ‘विकलांग’ झाली होती. एकाची काच फुटली होती. बाकीच्या घड्याळांचे सेल विखुरले होते... मी ते सगळे एकत्र केले!
त्याची रात्र ‘संस्मरणीय’ ठरल्याची माझी खात्री झाली.
मी घरात पहिले, आम्ही मोठ्या मिनतवारीने जमविलेली सगळी घड्याळे ‘विकलांग’ झाली होती. एकाची काच फुटली होती. बाकीच्या घड्याळांचे सेल विखुरले होते... मी ते सगळे एकत्र केले!
घरी पोहोचताक्षणी सुरू झालेला दोस्ताच्या शिव्यांचा उमाळा काही मिनिटांनी थोडा थंडावला आणि मग मी आस्थेवाईकपणे चौकशी सुरू केली, तेव्हा दोस्ताने एक एक गोष्ट कबुल करायला सुरवात केली. तो म्हणाला, ‘‘सगळे लाईट बंद करून फक्त समई चालू ठेवायची तुझी आयडिया जबरदस्त होती.’’ म्हटले, ‘ओके.’
मग म्हणाला, ‘अलार्म क्लॉक’ची आयडिया कुणाची?’
म्हणालो- माझी.
दोस्त मोकळ्या मनाने म्हणाला, ‘टायमिंग जबरदस्त जमले होते!’
जमायलाच हवे होते ना. नसते जमले तर आमचा अनुभव काय कामाचा?
मग त्याने एकेका घड्याळाची संक्षिप्त स्टोरी सांगितली.
त्याने सांगितलेली आणि त्यानुसार `बिटवीन द लाईन्स` आम्ही कल्पिलेली ही ‘उभयपक्षी’ कहाणी येणेप्रकारे -
त्याने सांगितलेली आणि त्यानुसार `बिटवीन द लाईन्स` आम्ही कल्पिलेली ही ‘उभयपक्षी’ कहाणी येणेप्रकारे -
पहिला अलार्म रात्री 10.30 चा ठेवला होता. ते घड्याळ समईखाली होते. सहज सापडण्यासारखे. त्यांना थोडा डिस्टर्ब झाला, पण घड्याळ लगेचच सापडले. अलार्म डिसेबल केला. सुहागरात पुढे सुरू.
दुसरा अलार्म रात्री 11चा होता. हे घड्याळ भिंतीमध्ये असलेल्या कपाटातील पुस्तकांमागे होते. रंगाचा थोडा भंग झाला पण थोड्या मेहनतीने घड्याळ सापडले. अलार्म बंद केला. माझ्या नावाने चार शिव्या देत त्याने पुढील काम सुरू केले.
तिसरा अलार्म रात्री 12 चा होता. या वेळची ‘वेळ’ जास्तच अडचणीची ठरली. घड्याळ सापडेना, अलार्म चालूच... कारण घड्याळ बुटांच्या कप्प्यात, बुटांत लपविले होते. कसेबसे सापडले... दोस्ताने अलार्म बंद केला आणि घड्याळ जोराने आपटले...
चौथा अलार्म रात्री पाऊण चा होता. या वेळी मात्र स्थिती खूपच बिकट आणि हातघाईची होती! एकीकडे अलार्म घणाणत होता आणि घड्याळ तर सापडतच नव्हते... त्यात चार-पाच मिनिटे गेली... अखेर लक्षात आले, घड्याळ सिलिंग फॅनच्या वर असलेल्या उलट्या वाटीत आहे... त्याने आधी फॅन ऑफ केला. तो लवकर थांबतच नव्हता. चक्क हाताने थांबविला आणि स्टूलवर चढून घड्याळ काढले, अलार्म ऑफ केला आणि फेकून दिले. काच फुटली.
पाचवी वेळ मात्र आणीबाणीची ठरली...! रात्रीचे दोन वाजलेले... सारे काही ‘सुरळीत’ चाललेले... अचानक अलार्म वाजू लागला... दाम्पत्य बेचैन... घड्याळ काही सापडेना. बुटाचा कप्पा, समई ठेवलेला स्टूल, पुस्तकाचा कप्पा... सगळे काही तपासून झाले. आवाज तर चालू होता. खोलीच्या मध्यभागातून येत होता. अखेरचा उपाय म्हणून त्याने कॉटच्या खाली डोकावून पाहिले. घड्याळ कॉटला खालून बांधलेले होते. एखाद्या जीपच्या खाली बॉम्ब बांधतात ना, तसे...! (मग... आमचे डोके आहे बॉस!) हे घड्याळ आम्ही बांधले एवढे मजबुत होते, की त्याला सोडवता येईना. पठ्ठ्याने सारे बळ एकवटून खेचून काढलेे. पण आवाज बंद करण्याचे बटन सापडेना... मग त्याने ते घड्याळ चक्क भिंतीवर जोराने आपटले... घड्याळ फुटले, सेल बाहेर पडले आणि आवाज एकदाचा बंद झाला...!
त्यानंतरचा आलार्म मी लावलेला नव्हता... पण त्यांच्या मनात धास्ती बसलेलीच होती...!
मी सगळी घड्याळे गोळा केली. नव्याने चालू केली. फुटलेल्या काचा बदलण्यासाठी दुसर्या दोस्ताला बाजारात पाठविले...
अलार्मच्या घड्याळाचा ‘वेगळा’ उपयोग आम्ही प्रयोगात आणून पाहिला होता...!
Subscribe to:
Posts (Atom)








